Home » राजकीय » जनतेला बॉण्ड पेपर वर एफीडेविट थेट लिहून देणारा एकमेव उमेदवार इंजि.विद्वान केवटे

जनतेला बॉण्ड पेपर वर एफीडेविट थेट लिहून देणारा एकमेव उमेदवार इंजि.विद्वान केवटे


  1. अजीज खान प्रतिनिधी–उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी लोकांचा कौल भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी चे उच्च शिक्षित उमेदवार इंजि.विद्वान केवटे असल्याचे दिसत आहे.लोकांमध्ये विशेष करून तरुणाई मध्ये विशेष चर्चा आहे की, ज्या उमेदवाराचा विकासाबरोबरच शिक्षण,शेती,रोजगार आणि सर्वांगीण विकास हा ज्यांचा प्राथमिक अजेंडा आहे असाच उमेदवार आम्ही निवडणार आहोत.
  2. “सुशिक्षित जागृत समाजाशिवाय सुदृढ लोकशाहीची संकल्पना शक्य नाही .” शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत.तेच विचार आपल्या डोक्यात भिनवुन समाजात चांगले शिक्षण, सरकारी शाळा वाचल्या पाहिजे,जुनी पेन्शन मिळाली पाहिजे,ओबीसी जनगणा झाली पाहिजे,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा,बंदी भागातील रस्ते,वीज ,पाणी,आरोग्य आणि शिक्षण ह्या समस्या सुटाव्यात,मराठा आरक्षण,आदिवासी, भटके विमुक्त, मायनॉरिटी बांधवांच्या समस्या आणि उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व जनतेचे संविधानिक अधिकार प्राप्त करन्यासाठी लढा देऊन पाच वर्षात उमरखेड महागाव विधानसभेचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.अशी बाँड पेपर वर लेखी ग्वाही देणार.”म्हणून विद्वान केवटेंनी सांगितले.
    विद्यार्थी,युवा,बेरोजगार आणि शेतकरी शेतमजूर त्यांच्या प्राथमिक अजेंड्यावर असले पाहिजे. असा विद्वान केवटेंचा मानस असून ते राजकारणात नसताना सुद्धा लोकांमध्ये विकास घडविण्यासाठी जाती-धर्माच्या वर उठून जनतेप्रती इमानदारी व निष्ठा आणि मेहनततीच्या जोरावर विकास करण्याचा विडा उचलला आहे.शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करून विद्यार्थी चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले.बामसेफ भारत मुक्ती मोर्चा ह्या कॅडर बेस संघटनांमध्ये कॅडर घेऊन निर्भिड वक्तृत्व आणि कार्यकुशलता,कुशल संघटक,मधुर,तेवढीच परखड वाणी असलेले.आज ते इमानदार युवा आणि उच्च शिक्षित भावी आमदार म्हणून जनता आता त्यांच्याकडे बघत आहे.तालुक्यातील मुळावा ही त्यांची जन्मभूमी असून, इंजिनीयरींग चे शिक्षण प्राप्त करून,भारत मुक्ती मोर्चा च्या माध्यमातून राष्ट्रिय प्रचारक,राष्ट्रिय महासचिव म्हणून ते प्रबोधन आणि संघटनात्मक कार्य करण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये गेलेले आहेत.अनेक भाषांवर प्रभुत्व,अठरापगड जाती धर्मातील बांधवांशी प्रचंड वैचारिक समन्वय असलेले सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून ते सर्वपरिचित आहेत.एकिकडे राजकारणात पैसा महत्वाचा असतो असा सर्वत्र समज आहे.परंतु इकडे सर्वसामान्य,गोर गरीब जनता मात्र विद्वान केवटेंना निवडणूक लढवा म्हणून स्वत:च्या मेहनतीचे पैसै देत आहेत.उमेदवाराला जनता पैसे देत आहे,हे अनोखे उदाहरण या मतदारसंघात बघायला मिळत आहे.
    आमच्या प्रतिनिधीने तरुण वर्गाला, जनतेला भावी आमदार म्हणून विद्वान केवटे कसे असतील? याबद्दल मत विचारले. त्यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रीया दिली की, “आत्तापर्यंत निवडूण आलेल्या उमेदवारांनी कधीही विद्यार्थी, बेरोजगार, कामगारांसाठी, शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उचलला नाही.फक्त पोकळ आश्वासने दिली.तालुक्यातील बंदिभाग आणि इतर क्षेत्रात अजून मूलभूत सुविधा देण्यात सुद्धा सपशेल अपयशी ठरलेले आजपर्यंत चे प्रतिनिधी आणि त्यांच्या राजकीय चढाओढीच्या राजकारणाला जनता आता प्रचंड कंटाळलेली आहे आणि असे लोक समाजाचे प्रतिनिधित्व नसून केवळ आपापल्या प्रस्थापित पक्षाचे प्रतिनीधी आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण केला.एकीकडे “मा.विद्वानभाऊ केवटे हे सत्तेत नसून सुद्धा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वेळा विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, गोरगरीब समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने अनेक आंदोलने केली आणि विशेष म्हणजे हाती घेतलेल्या प्रत्येक आंदोलनात जनतेला यश मिळवून दिले.
    येणाऱ्या उमरखेड महागाव विधानसभेच्या निवडणुकीत सर्व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना संविधानिक हक्क अधिकार मिळवून देणार!.. आणि हे काही पोकळ आश्वासन नसून जनतेला बॉण्ड पेपर वर एफीडेविट थेट लिहून देखील देत आहेत जी आत्तापर्यंत इतर कुठल्याच प्रस्थापित पक्षात ही हिम्मत नाही.म्हणून आमचे मत फक्त आणि फक्त विद्वान केवाटेंनाच!” असे मत व्यक्त केले.यावरून असे दिसते की कोणत्याही पक्षाने कोणालाही विद्वान केवटे विरुद्ध उभे केले तरी जनतेचा कौल मात्र विद्वान केवटेंनाच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या