- एरंडोल तालुक्यातील1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित… अनुदान कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत…….
एरंडोल प्रतिनिधी —
केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ठिबक तुषार सिंचन योजना ही राबविण्यात येते यात एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकऱ्यांचे गेल्या 2023/24 या वर्षाचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान रखडले असल्याने तालुक्यातील शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करताना दिसून येत आहे.
पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतीचा विकास साधण्यासाठी शासनातर्फे ठिबक तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे यामुळे अतिउष्णतेमुळे उन्हाळ्यात पिकांना या योजनेमुळे आवश्यकतेनुसार पाणी देण्यात येते यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाचा फायदा मिळत असतो मात्र गेल्या वर्षभरापासून तुषार सिंचन योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.
तुषार सिंचन योजना 80 टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येते यामुळे शेतकरी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेत असून पाण्याचा होणारा अपवेय कमी होऊन पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठिबक योजना कार्यान्वित केली गेली आहे मात्र अर्ज करून देखील योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.
ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अनुदानाची रक्कम वेळेत मिळाल्यास शेतकरी अधिक संख्येने या योजनेकडे वळू शकतात मात्र तसे अद्यापही होताना दिसून येत नाही अनुदानाची रक्कम वेळेवर जमा करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून सदर योजनेची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
एरंडोल तालुक्यातून 1942 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यात केवळ 450 शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान गेल्या दीड वर्षापासून मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिन झाल्याचे दिसून येत आहे एरंडोल तालुका हा बागायती कपाशी व मक्याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत मात्र गेल्या वर्षाच्या शेतकऱ्यांना अद्याप पावतो कुठलीही अनुदानाची रक्कम मिळालेली नसून शेतकरी राजा हा हवालदील झालेला दिसून येत आहे तरी आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी शासन स्तरावर रेटा लावून सिंचन अनुदान शेतकऱ्यांना मिळवून द्यावे अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे…